इस्लामाबाद : बंदुकीचा धाक दाखवून भारतीय महिलेला पाकिस्तानमध्ये विवाह करण्यास भाग पाडले आहे. भारतीय महिलेचा पाकिस्तानातील नागरिकासोबत जबरदस्तीने विवाह करण्यात आला. या खळबळजनक घटनेनंतर, या पीडित महिलेने पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांना भारतात परतण्यासाठी मदत करण्याची विनंती देखील केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पीडित महिलने पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांची भेट घेऊन आपबिती कथन केली. यावेळी तिने भारतात सुरक्षतिपणे पाठविले जात नाही, तोपर्यंत भारतीय उच्च आयुक्तालय सोडणार नाही असे म्हटले आहे. 


उझमा असे या भारतीय महिलेला बंदुकीच्या धाकावर पाकिस्तानात पळवून नेण्यात आले. तिने इस्लामाबाद उच्च न्यायालयात पती ताहीर अलीविरोधीत खटला भरल्याने ही बाब प्रकाशझोतात आली. पती ताहिर विरुध्द धमकावणे आणि छळ करणे, असा आरोप तिने केला. तिने न्यायालयातील जबाबात स्थलांतराचे कागदपत्रे पतीने बळजबरीने घेतल्याचे सांगितले आहे, अशी वृत्तसंस्थेची माहिती आहे.