नवी दिल्ली : पाकिस्तानने अरबी समुद्रातून त्यांच्या सीमाभागातून ४३ भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेतलं आहे. रविवारी त्यांना पाकिस्तानच्या सुरक्षा जवानांनी ताब्यात घेतलं. सिंध प्रांताजवळ अटक करुन मच्छिमारांना कराची येथे नेण्यात आलं. 


मच्छिमारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांना पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आल्याचं कळतंय. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एधी फाउंडेशनने या मच्छिमारांसाठी जेवन उपलब्ध केलं.