मुंबई: ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपरमध्ये करण्यात आला होता. या प्रकरणावर ऐश्वर्यानं मौन बाळगणच पसंत केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरबजीत चित्रपटाचा ट्रेलरवेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ऐश्वर्याला पनामा पेपरबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा अभिनेता रणदीप हुडा ऐश्वर्याच्या मदतीला आला, आणि सरबजीतबाबत प्रश्न विचारा असं तो पत्रकारांना म्हणाला.


या प्रकरणाबाबत आधीच प्रतिक्रिया आलेल्या असल्याचं सांगत ऐश्वर्यानं याबाबत बोलणं टाळलं. पनामा प्रकरणामध्ये आपल्या नावाचा दुरुपयोग करण्यात आल्याची प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी याआधीच दिली आहे. तसंच या रिपोर्टमध्ये ज्या कंपनींची नावं आहेत, त्याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचंही अमिताभ म्हणाले होते.