मुंबई : शेतकरी आणि लष्कराला मदत करून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारनं त्याचं सामाजिक भान वारंवार दाखवून दिलं आहे. यावेळीही अक्षय कुमार शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या मदतीला धावून आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या आठवड्यामध्ये आसामच्या दिबगोईमध्ये भारताचे तीन जवान शहीद झाले. यामधल्या एन.के.नरपत सिंग यांच्या कुटुंबियांना अक्षयनं नऊ लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. नरपत सिंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन मुलं असं कुटुंब आहे.


काहीच दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं लष्करातल्या जवानांची भेट घेतली होती. महाराष्ट्रातल्या विदर्भातलं एक दुष्काळी गावही अक्षय कुमारनं दत्तक घेतलं होतं.