मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने केंद्र सरकारच्या सर्व केंद्रीय विद्यापीठांत तिरंगा लावण्याच्या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. एक ट्वीटच्या आणि फेसबूक पोस्टच्या माध्यमातून त्याने हा पाठिंबा दर्शवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'प्रत्येक केंद्रीय विद्यापीठाच्या आवारात तिरंगा फडकवण्याच्या निर्णयाच्या मी सोबत आहे. आणि का नाही? आपल्यातील देशभक्ती उंच फडकणारा तिरंगा नेहमी जागी करतो #TricolourForUnity' अशा आशयाचा मजकूर त्याने टाकला आहे. 


केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केंद्रीय विद्यापीठांच्या एका बैठकीत विद्यापीठांच्या आवारात तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेतला होता ज्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.