मुंबई : उत्तर प्रदेशात मिळवलेल्या यशाबद्दल आशा भोसलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. हे भरभरून कौतुक करताना आशाजींनी 'हर हर मोदी'चा सूर आळवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या म्हणाल्या, 'इतक्या मोठ्या लोकशाही देशात राहत असल्याचा मला अभिमान वाटतोय. आता लोकशाही निवडणूकीत कोण जिंकेल, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.' सोबतच त्यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं.


या यशाचा आनंद कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिरवणूक काढून आणि 'केसरी' होळी खेळून साजरा केला. या विजयासाठी अनेकांनी त्यांचं अबिनंदन केलं. सोशल मीडियावरही या विजयाचे पडसाद दिसून आले.


विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी होती, त्यात भाजपने उत्तर प्रदेशात 300हून जास्त जागा मिळवल्या. भाजपसाठी ही लढाई प्रतिष्ठेची मानली जात होती.