चेन्नई : कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तर आज अखेर चाहत्यांना मिळतेय. आज हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रदर्शित झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान तामिळनाडूमध्ये या सिनेमाचे सुरुवातीचे शो रद्द केल्याची माहिती मिळतेय. तर दुसरीकडे या सिनेमाचा ३० सेकंदाचा सीन लीक झाल्याचीही बातमी आहे.


तामिळनाडूत आर्थिक कारणामुळे राजामौली यांच्या बाहुबली२ चे सकाळचे शो रद्द करण्यात आलेत. सिनेसृष्टीशी निगडित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार के. प्रॉडक्शन(तामिळ बाहुबलीचे डिस्ट्रिब्यूटर) आणि निर्माते यांच्यात पैशावरुन वाद झाल्याने सकाळचे शो रद्द करावे लागले. कारण त्यांनी रिलीज करण्यासाठी परवानगी मिळाली नव्हती.