मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली दोघेही रिलेशनशिप आहे हे आता जाहीर आहे. अनुष्का-विराट दोघे नेहमी चर्चेत राहिले आहेत. अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लग्नाबाबत वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाबाबत जेव्हा अनुष्काला विचारण्यात आलं तेव्हा ती बोलली की, 'मी लग्न निश्चितच करु इच्छिते. कुटुंब असणं मला ही आवडतं. मी एक अॅक्टर असली तरी मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी नेहमी साधं राहणीमान जगते. मला वाटतं की जेव्हा वेळ येईल तेव्हा लग्न होईल. मी लग्न तेव्हा करेल जेव्हा मी मानसिकरित्या त्यासाठी तयार होईल. लग्न ही चेष्ठा नाही आहे. दूसऱ्या व्यक्तीसोबत तुमची लाईफ शेअर करण्यासाठी मानसिकरित्या तयार व्हावं लागतं. हे एका व्यक्तीशी संबंधित नाही आहे. या स्टेजवर पोहोचण्यासाठी दोघे इंटरेस्टेड हवे. जेव्हा मी मानसिकरित्या या स्टेजवर पोहोचेल तेव्हा मी लग्न करेल.'