मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या घटस्फोटांची मालिका संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. करिश्मा कपूरने तिचा पती संजय कपूरसोबतच्या तिच्या विवाहाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतलाच होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, आता या कथेने वेगळंच वळण घेतलेलं दिसतंय. 'मिड डे' वृत्तपत्रातील एका बातमीनुसार करिश्माने तिचा पती संजय आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हुंड्याप्रकरणी सासरच्यांरकडून आपला छळ झाल्याचा आरोप तिने केला आहे.


खार पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजयने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याच्या मते करिश्माने त्याच्यासोबत पैशांसाठी लग्न केले होते. आता या प्रकरणाची सुनावणी ३ मार्चला होणार आहे.