मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या टीआरपीमध्ये अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी राणादा आणि अंजलीबाईंची 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी अनुक्रमे 'काहे दिया परदेस', 'चला हवा येऊ द्या' आणि 'चूक भूल घ्यावी द्यावी' या मालिका आहेत. 


नुकतेच नवऱ्याची बायको आणि तुझ्यात जीव रंगला मालिकेत गुढीपाडवा विशेष भाग पार पडले. राणादा आणि अंजली यांनी पाडव्याच्या शुभमूहूर्तावर वाड्यात प्रवेश केल्याने या मालिकेचे चाहते चांगलेच खुश झालेत. तर दुसरीकडे राधिकानेही शनायाच्या नाकावर टिच्चून गुरुनाथ आणि अथर्वसह पाडवा साजरा केला. त्यामुळे या मालिकेतील गंमत अधिकच वाढत चाललीये.


दरम्यान, खयाली पुलाव या भन्नाट नावाचे हॉटेल चालवणाऱ्या पाच मित्रांची गोष्ट अर्थात दिल दोस्ती दोबाराला मात्र टीआरपीमध्ये पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.


दिल दोस्तीच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. मालिका सुरु झाल्यानंतर काही काळातच ही मालिका लोकप्रिय झाली होती. हे सारे दोस्त नव्या रुपात, नव्या ढंगात दिल दोस्ती दोबाराच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांसमोर आलेत. मात्र त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत असलेला दिसत नाहीये.