मुंबई : अवघ्या लहान वयात प्रसिद्धी मिळवणाऱ्या टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूने संपूर्ण टीव्ही क्षेत्रात खळबळ उडाली. तिने आत्महत्या कऱण्यामागचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र ती तणावाखाली होती की दुसरे काही कारण होते याचा शोध पोलीस घेतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्महत्या कऱण्यापूर्वी चार दिवस आधी प्रत्युषाने आपल्या आईला फोन करुन तिच्या हातचे जेवण जेवायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा आईने तिला घरी म्हणजे जमशेदपूर येथे येण्यास सांगितले. मात्र त्यांना कुठे माहीत होत की प्रत्युषा यापुढे कधीच येऊ शकणार नाही ते. 


प्रत्युषाच्या मृतदेहावर शनिवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्येही श्वास गुदमरल्याने तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.