मुंबई :  वाटतं नर्गिस फाखरीचे मन बॉलिवूडपासून उबले आहे. आता बातम्या अशा आल्या आहेत की नर्गिसने बॉलिवूडला सोडण्याच्या तयारी केली आहे. ती आता अमेरिकेला गेली आहे आणि पुन्हा परतली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नर्गिस नुकतीच 'हाऊसफूल ३' आणि अझहरमध्ये दिसली होती. ढिशूम या चित्रपटातही तिचा छोटा रोल आहे. आगामी काळात ती रितेश देशमुखच्या बन्जो चित्रपटात दिसणार आहे. पण आता तिच्या हातात काहीच काम नाही. 


नर्गिसच्या अचानक बदलल्याच्या मूडचे खरं कारण उदय चोपडा म्हटले जात आहे. नर्गिसने उदय चोपडाला लग्नाबद्दल विचारले होते, त्यावर उदयने नकार दिला. उदयच्या या उत्तराने नर्गिस हैराण झाली. अफवा आल्या की त्यांच्यात जोरदार भांडण झालं. 


काही दिवसांपूर्वी उदयने नर्सिगशी लग्नाबद्दल विचारले होते. त्यावेळी नर्गिसने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करते असे सांगितले होते. पण आता प्रकरण उलटलं आहे. आता काही तिचे चित्रपटांच शुटिंग शिल्लक बाकी आहेत. त्यामुळे ती न्यूयॉर्कमधून पुन्हा भारतात कधी येते आणि शुटिंग पूर्ण करते याकडे निर्माते, दिग्दर्शकांचे लक्ष लागून राहिले आहे. 


विशेष म्हणजे या भांडणामुळे आणि वादामुळे नर्गिसने आपला चित्रपट 'हाऊसफूल ३'चे प्रमोशनही केले नव्हते. आपल्या मित्रासोबत अमेरिकेत क्वालिटी टाइम स्पेंड करणार असल्याचे कारण सांगून कन्नी कापली होती.