मुंबई : लव्ह लग्न लोचा ...ज्या मालिकेच्या नावातच लोचा आहे , तिथे लोचे होणे ही काही नवीन गोष्ट नाही. मैत्रीचं प्रेम, लग्नातील मज्जा आणि या सगळ्यांतून होणारे लोचे हे आज प्रत्येकाच्या आयुष्यातील एक भाग आहे.


 झी युवाच्या या फ्रेश मालिकेला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. या मालिकेने बच्चे पार्टीपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला आपलेसे केलं आहे.  मैत्रीचे वेगेवेगळे रंग दाखवणारी ही मालिका सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि गावात आवडीने पहिली जात आहे. 
 
 यातील राघव , सौम्या , अभिमान , सुमीत , विनय , काव्या , आकांशा आणि खळखळून हसणारी शाल्मली ही मित्रमंडळी आज सगळ्यांची आपली झाली आहेत. आज मैत्रीच्या मालिकांमध्ये लव्ह लग्न लोचा उच्चांग गाठत आहे. पण या मालिकेमध्ये एक मोठा लोचा होणार आहे. 
 
 याच टीम ला आता बेघर व्हावे लागणार आहे. म्हणजे विनय राघव आणि सुमीतला. त्याच काय झालंय विनय राघव आणि सुमीत हे गेली अनेक वर्षे माने कुटुंबियांच्या फ्लॅट मध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहतात हे आपल्याला माहीतच आहे. माने कुटुंब सुद्धा त्यांना अगदी मुलासारखे सांभाळतात प्रेम करतात. पण हेच माने कुटुंबियांच्या खऱ्या मुलाला खुपले. एक तर तो अनेक वर्षे अमेरिकेत होता. 
 
 स्वभावानेच अहंकारी , तिरकस असलेला श्रीकांत  म्हणजेच आपला समीर खांडेकर. आता श्रीकांत तिरस्काराने पेटला आहे . त्यामुळे माने काकूंना तो पटवून देणार आहे की ही आपली विनय , सुमीत आणि राघव ची गॅंग कशी चुकीची आहे आणि त्यांना तो  घराबाहेर काढणार आहे. पण त्यानंतर काय? श्रीकांत खरंच असे करू शकेल ? 
 
 आपले विनय , सुमीत राघव कुठे जाणार ? गुडच्या विरुद्ध बॅड एकमेकांच्या समोर काय टिकणार ?  या लोच्याच नक्की काय होते हे पाहण्यासाठी पहात राहा "लव्ह लग्न लोचा "झी युवावर सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता.