मुंबई : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर आता कॉमेडी नाइट्स बचाओ सीजन 2मध्ये पाकिस्तानी कलावंत दिसणार नाहीत. या मालिकेचे दिग्दर्शक विपुल शहा यांनी ही घोषणा केली आहे. या मालिकेच्या पहिल्या सीजनमध्ये पाकिस्तानी कलावंत होते.


मनसेचे कार्यकर्ते या मालिकेच्या सेटवर गेल्यानंतर दिग्दर्शक विपुल शहा यांच्यावर दबाव आला आणि त्यांनी हा निर्णय घेतला.