मुंबई : देशातल्या महत्त्वाच्या स्थळांना नेहरू-गांधी परिवाराची नावं देण्यास ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतल्या रस्त्यांची नावं बदलण्यासाठी सध्या सुब्रमण्यम स्वामी आक्रमक झालेत. तोच धागा पकडून ऋषी कपूर यांनी इंदिरा, राजीव गांधींची नावं हटवण्याचं आवाहन केलंय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी गांधी नावावर जोरदार हल्लाबोल केलाय. 


वांद्रे वरळी सी-लिंक, फिल्म सिटी, दिल्लीचं विमानतळ यांची नावं बदलली पाहिजेत, असं कपूर यांनी म्हटलंय. 






दरम्यान, भाजपच्या गुडबुक्समध्ये येण्यासाठी काही लोक काँग्रेसचा अपप्रचार करत असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते पी.सी. चाको यांनी कपूर यांना लगावलाय