मुंबई : झी मराठीवरील जय मल्हार ही मालिका आता प्रेक्षकांच्या निरोप घेतेय. नुकतीच या मालिकेची सक्सेस पार्टी झाली. यावेळी या मालिकेतील कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हाळसाची भूमिका साकारणाऱ्या सुरभी हांडेने यावेळी म्हाळसाकडे प्रार्थनाही केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालिकेप्रमाणेच आम्हा कलाकारांवर प्रेक्षकांनी मनापासून आणि भरभरुन प्रेम केले. म्हाळसाला लोकांनी आपलंस केलं. त्यांनी विश्वास ठेवला. पुढच्या प्रोजेक्टबाबत थोडं टेन्शन आहे. काय होणार आहे याच टेन्शन आहेच. 


म्हाळसाकडे केवळ एकच प्रार्थना करेन की तु माझ्यातून कधीही जाऊ नकोस. मला सपोर्ट करणं कधी सोडू नकोस असं सुरभी यावेळी म्हणाली.