मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या साखरपुडयाची सध्या इंटरनेटवर चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघांचाही १ जानेवारीला साखरपुडा होणार असल्याचे बोलले जातेय. इतकंच नव्हे तर त्यांच्या साखरपुड्यासाठी अंबानी तसेच बच्चनही डेहराडूनमध्ये पोहोचल्याची जोरदार चर्चा रंगतेय. 


यातच विराट-अनुष्काच्या साखरपुड्याबाबत अधिकृत विधान समोर आलेय. अनुष्काच्या प्रवक्त्यांनी विराट-अनुष्काच्या साखपुड्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केलेय. या प्रवक्त्यांनी एका दैनिकाला दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का आणि विराटच्या साखरपुड्याच्या बातमीत कोणतेही तथ्य नाही.


विराट आणि अनुष्का सध्या उत्तराखंडमध्ये आपली ख्रिसमस सुट्टी एंजॉय करतायत. काही दिवसांपूर्वीच युवराज सिंहच्या लग्नातही हे दोघे एकत्र दिसले होते.