पालघर : तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव येथील पंधरा मच्छिमार सूखरूप बचावलेत. तराफाच्या मदतीनं खवललेल्या समुद्रातून हे पंधरा जण साडे चार किलोमीटर अंतर पोहून उंबरगाव येथील वृदावन परिसरातील किना-यावर साडे तीन वाजता पोहोचले.


काल झाई बोरीगाव येथील एक बोट मच्छिमारीसाठी समूद्रात गेली असता ती मध्ये बंद पडली. त्यानंतर सदर बोटीला मदत करण्यासाठी त्याच गावातील दूसरी बोट तिथे गेली असता खवललेल्या समूद्रात अंदाज न आल्यांनी दोन्ही बोटी एकमेकावर आदळून दोन्ही बोटीत पाणी शिरले. त्यानंतर सदर बोटीतील मच्छिमारांशी घरच्यांशी काहीही संपर्क होत नसल्याने , या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.  त्यानंतर पोलीस , कोस्ट गार्ड आणि नेव्हीच्या मदतीने काल रात्री साडे आठ वाजेपासून शोध मोहीम सुरू झाली.  दरम्यान पहाटे सदर मच्छिमार सुखरुप किना-यावर सापडले.