औरंगाबाद : ही बातमी आहे स्वच्छ मोहिमेला लागलेल्या लाचखोरीच्या डागाची. केंद्र सरकारकडून शहर स्वछता अभियानासाठी आलेल्या कन्सलटंट कंपनीच्या अधिका-याला लाच घेताना एसीबीनं रंगेहाथ अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शैंलेंद्र बदामिया असं या अधिका-याचं नाव आहे. औरंगाबाद शहर स्वच्छता अभियानाच्या टॉप टेनमध्ये समाविष्ट करण्यासाठी बदामियानं पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी या प्रकाराची तक्रार एसीबीकडे केली. 


सापळा रचून बदामियाला एक लाख सत्तर हजाराची लाच घेताना अटक करण्यात आलीय. याआधी हेच पथक पिंपरी चिंचवड, नांदेड आणि अमरावती इथं स्वच्छता पाहणी करुन आलय. शहर स्वच्छता अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र लाचखोर अधिका-यामुळेच या मोहिमेला डाग लागलाय.