अहमदनगर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी विरोधी पक्ष आणि सत्तेत असलेला शिवसेना पक्षही आक्रमक झाला असतांना आता अहमदनगर जिल्ह्यातून कर्जमाफीच्या आंदोलनाची मशाल पेटली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नेवासा इथे आज क्रांतीकारी शेतकरी पक्ष आक्रमक झाला असून नेवासा तहसिल कार्यालयावर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सातबारा उताऱ्याने भरलेल्या बैलगाड्या घेऊन मोर्चा काढत सातबारा उतारे तहसील कार्यालयासमोर फेकून देण्यात आले . 


केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या वेळी मोर्चे करांनी केला.