पुणे : भाजप सरकार अनाठायी खर्चाची उधळपटी करत आहे. राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महारांजाचे स्मारक अरबी समुद्रात बांधण्याचा घाट घालत आहे. या कामाचे भूमीपूजन करण्याचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.


राज्यात भूमीपूजनाव्यतिरीक्त भाजप- शिवसेना सरकार काहीही करत नाही. केवळ जाहिरातीवर मात्र अनाठायी खर्च करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिलचे भूमीपूजन  झाले आहे. त्याठिकाणी एक खडडादेखील  यांनी खोदला नाही. तसेच आंबेडकर स्मारकाबाबत अजून ठोस निर्णय यासरकारने केलेले नाही केवळ निवडणुका डोळयासमोर ठेवूनच निर्णय घेतला, अशी टीका अजित पवार यांनी केली.