डोंबिवली : भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दलित आणि शेतकऱ्यांविषयी अपमानजनक उद्गार काढल्याचा आरोप केला जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने आयोजित स्मार्ट सिटी शिखर परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना रविंद्र चव्हाण यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्याविरोधात विरोधकांनी आंदोलनं केली आहेत. डोंबिवली मतदारसंघाचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी कल्याणमध्ये केलेल्या भाषणात जातीवाचक उल्लेख केला असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) यांनी केला आहे. 


या प्रकरणी रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी रामनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. आमदार चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. परंतु त्यांच्या भाषणाची शुटींग तपासून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन सहाय्यक पोलीस उपायुक्त सुर्यकांत घावडे यांनी दिले आहेत.