औरंगाबाद : वडिलांनी एटीएममधून पैसे काढून न दिल्यामुळे एका युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. संदीप घोडे असं या मृत युवकाचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावाला जाण्यासाठी त्याने वडिलांकडं 5 हजार रूपये मागितले होते. मात्र वडिलांकडे केवळ 2 हजार रूपयेच होते. एटीएममधून केवळ 2 हजार रूपयेच काढता येत असल्यामुळे वडिलांनी त्याला थांबायला सांगितलं होतं. मात्र संदीपनं संतापाच्या भरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सिडकोच्या एन तेरा भागात ही दुर्दैवी घटना घडली.