ठाणे : भिवंडीतील गैबीनगरमध्ये एक दोनमजली इमारत खचलीये. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या इमारतीत आठ ते दहा कुटुंब रहात असून या दुर्घटनेत 30 ते 35 जणं अडकल्याची माहिती मिळतीये. अडकलेल्या व्यक्तींची सुटका कऱण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. 


ही इमारत आधीच धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यानंतरही ही कुटुंबे इमारतीत राहत होती.