अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्य़ातल्या अकोले तालुक्यातल्या बारी घाटात एसटी बसचा भीषण अपघात होता होता टळलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारी घाटावरुन जात असताना बस दरी पासून अवघ्या दहा फुटांवर बस थांबली. चालकाने वेळीत प्रसंगावधान राखत बसवत नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला.


चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील तब्बल ६० जणांचे प्राण वाचले. या अपघातात 20 जण जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.