जालना : शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा आता रावसाहेब दानवे यांच्या दारात पोहचलाय. जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमधल्या दानवेंच्या निवासस्थानासमोर तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावसाहेब दानवेंच्या राजीनाम्याच्या मागणी या तरूणांनी केलीय. आज सकाळपासून ४ तरुणांनी हे उपोषण सुरु केलंय. दोन दिवसांपूर्वी दानवे यांनी जालन्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांने तूर खरेदी संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.


या वक्तव्याचे काल दिवसभर विरोधकांच्या आंदोलनाने राज्यभरात पडसाद उमटले.तर आज दानवे यांच्या भोकरदन येथील घरासमोर उपोषण सुरु करण्यात येऊन दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय.