जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अचानक आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, असे ते म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षांतर्गत भांडण चव्हाट्यावर आल्याने खडसेंनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलं आहे. भुसावळ येथे तहसिल कार्यालयाच्या नुतन इमारतीच्या अनावरण कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.


आपल्यावरील आरोप हा एका कटाचाच भाग असून, त्यावर बोललो असतो तर सारा देश हादरला असता असे वक्तव्य करणाऱ्या एकनाथ खडसेंनी अचानक आपल्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे. 


जर दाऊद आणि देशातील मंत्र्याचे संबध असल्याचे स्पष्ट झाले असते तर भारत हादरला असता, असे मला म्हणायचे होते. परंतु सध्या माझ्यावर जास्त प्रेम करणारी मीडिया हे आवर्जुन त्याला हवे तेवढे भाषण दाखवून मला चर्चेत आणत असल्याचं खडसे यांनी सांगितले.