सोलापूर : खडसेंवर झालेल्या तीन आरोपांपैकी दोन आरोपातून ते मुक्त झालेत. उरलेल्या तिसऱ्या आरोपातून मुक्त झाले की खडसेंना मंत्रिमंडळात योग्य स्थान मिळेल, असे सूचक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाच्या संघटनात्मक आढावा बैठकीसाठी ते सोलपुरात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकूणच भाजप प्रदेशाध्यक्षांचे हे विधान खडसेंसाठी फार महत्वाचे आहे.


कथित पीएची लाचखोरी, भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरण आणि दाऊद कॉल प्रकरणाच्या आरोपांवरून खडसेंना मंत्रीपद सोडावं लागलं होतं. यातल्या भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी अजून सुरु आहे.