मावळ : मावळ तालुक्यामधील् पाचाने या गावात पायाबा महाराजांच्या उत्सवानिमित्त वाटण्यात आलेल्या पेढ़याच्या प्रसादा मधुन गावकऱ्याना विषबाधा झाल्याची घटना घङलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री साडेनऊच्या सुमारास प्रसाद खाल्यावर अनेकाना उल्टी-जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. 


तब्बल २५०हून अधिकांना विषबाधा झाल्याने ८ ते ९ विविध रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. 


परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांची एक टीम पाचाने गावात दाखल झाली. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.