नाशिक : मनसेला जय महाराष्ट्र करणाऱ्या अनेकांची नाशिकमध्ये सध्या पंचईत झाली आहे. अनेकांनी मनसेला सोडचिट्ठी देत शिवसेना भाजपचा रस्ता धरला खरा, पण त्या पक्षातल्या निष्ठावंतांचा दबाव पाहता या नव्या आलेल्यांची कोंडी सुरू झालीय. तिकीट तरी मिळेल की नाही या शंकेनं ग्रासलेल्या अनेकांनी पुन्हा मनसेकडे परतायला सुरूवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्ष सोडून गेलेल्या अनेकांना पुन्हा एकदा इंजिनाची शिट्टी खुणावू लागलीय. मनसे कार्यालयात मुलाखतींना सुरूवात झालीय. त्या मुलाखतींना अनेकांनी परतायची तयारी दर्शवलीय.


भाजप आणि शिवसेनेत भाऊगर्दी आहे. उमेदवारीसाठी महिला सर्वाधिक प्रयत्न करत आहेत. निवडणुकीपूर्वी उमेदवारी देण्याचं आश्वासन देत अनेकांना पक्षात घेण्यात आलं. मात्र जागांपेक्षा इच्छूकांची संख्या कमालीची वाढली आहे. सर्वांना उमेदवारी शक्य नाही, त्यामुळे या नाराजीचा फायदा राष्ट्रवादी आणि मनसेला होऊ शकतो.