नागपूर : राज्याच्या उपराजधानीत सूर्य आग ओकत आहे. आज उष्माघाताने तीन ठिकाणी दोन वृद्धांसह तिघांचा मृत्यू झालाय. तिघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेशपेठ बसस्‍थानक परिसरात आज दुपारी ६५ वर्षीय वृद्ध बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


दुसरी घटना तहसील भागात घडली. बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या वृद्धाचा मेयो हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर काटोल नाका परिसरात ३५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. तिघांचीही ओळख पटलेली नाही. तिघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तिन्ही प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलीस अधिक तपास करीत आहेत.