मुंबई :  पोलीस किंवा सैन्य भरती होते त्याप्रमाणे भाजपमध्ये गुंड भरती होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. अशा प्रकारे गुंडांची भरती होणं हे संघ विचारांच्या विरोधात आहे. म्हणून आरएसएसचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी शिवसेनेवर मतप्रदर्शन करण्याआधी भाजपला उपदेश करावा, असा टोला संजय राऊत यांनी नागपुरात लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सद्गृहस्थ असून त्यांच्या हेतूबद्दल आपल्याला शंका नाही. मात्र ज्या प्रकारे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी तलवारी बाहेर उपसल्या आहेत, त्या आता म्यान होणं शक्य नाही. आणि तलवारी म्यान झाल्या तरी खडखडाट सुरुच राहील, असा स्पष्ट इशाराही राऊतांनी यावेळी दिला. 


मुंबईचं पाटणा झाल्याचा आरोप करणा-या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारीचा आलेख सतत चढाच असल्याकडे राऊतांनी लक्ष वेधलं. त्यामुळे नागपूरचं शिकागो झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.