धुळे : चंदू चव्हाण जोपर्यंत पाकिस्तानातून परत येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या आजीच्या अस्थींचं विसर्जन करणार नाही, असा निर्णय चव्हाण कुटुंबीयांनी घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीमारेषेवर तैनात जवान चंदू चव्हाण गस्त घालताना पाकिस्तानात गेले. त्यांना पाकिस्तानातून परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चंदू पाकिस्तानात गेल्याचं समजताच त्यांच्या आजीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं.


चंदू चव्हाण यांना लवकरात लवकर पाकिस्तानातून परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  पण जोपर्यंत ते परत येत नाहीत, तोपर्यंत आजीच्या अस्थींचं विसर्जन करणार नाही, असा निर्णय चव्हाण कुटुंबीयांनी घेतलाय.