कोल्हापूर : राज्यातल्या भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा तूर्त तरी विचार नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपची युती तुटल्याच्या पार्श्वभूमीवर, शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुंबई काँग्रेसवरही सडकून टीका केली. 


मुंबई काँग्रेसचे संजय निरूपम यांचं महाराष्ट्रासाठी कोणतंही योगदान नसल्याचंही यावेळी शरद पवारांनी म्हटलं आहे.


'आरएसएस'चे मा गो वैद्य यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यावर वक्तव्य केलं होतं. यावर नाव न घेता शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.