मुंबई : पुढच्या वर्षी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना राज्यात आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे. ते तातडीनं सुनावणी करून तीन महिन्यात निकाली काढावं अशी याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रमुख मागणी आहे.


शैक्षणिक आरक्षणासाठी याचिकाकर्ते आग्रही आहेत. याबाबत अंतिम सुनावणी 19 सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे.