मुंबई : बिल्डरांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी आता राज्याच्या विशेष पोलीस महासंचालकांनी पुढाकार घेतला आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून होणा-या फसवणुकीबाबत ज्या तक्रारी येतील, त्याची त्वरित दखल घेऊन कारवाई करा, असं परिपत्रकच राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी काढलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यभरातले पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना कारवाईचा वेग वाढवण्याचे आदेश देण्यात आलेत. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांकडून होणा-या फसवणुकीचे प्रकार वाढलेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये खदखद आहे.


हा आहे जीआर