भिवंडी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसनेच घडवून आणली, असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले होते. याबाबतची दोषारोप निश्चिती आज भिवंडी कोर्टात होणार आहे. त्यामुळे आज राहुल गांधी भिवंडीत हजर रहाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी राहुल गांधींना भिवंडी कोर्टानं जामीन मंजूर केला होता. 2014मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधींनी  भिंवंडीतील प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 


महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.. त्यांच्या या आरोपावर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात भिवंडी कोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टात उपस्थित रहाण्याचे आदेश देण्यात आले होते.