वसई : मुसळधार पावसानं वसई-विराराला झोडपून काढलंय.. वसईत रात्रीपासून बरसणा-या संततधार पावसामुळे वसईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसईतल्या मिठागरातील संपूर्ण वस्तीच पाण्याखाली गेलीये. या भागातल्या 125 घरांत पाणी शिरलंय तर जवळपास 400 लोक अडकून पडलीत. यापैकी 25 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. 


वसई पूर्वेडील सखल भागही पाण्याखाली गेलाय. एव्हरशाईन रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीची कोंडी झालीये. रात्री फुलपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्यानं मानवेल पाडा रस्ता, फुलपाडा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. तर नालासोपारा परिसरातील तुळिंज रोड, सेंट्रल पार्क रोड. आचोळे रोडवरही पाणी साचलंय.