ठाणे : दिव्याखाली अंधार ही म्हण का आहे? ते मला दिव्यात आल्यावर कळलं, अशी खोचक टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मनसेच्या वतीने आयोजित 'उत्सव दिव्याचा' या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


दिव्यात आलो तेव्हा मला वाटलं थंडीचं धुकं पडलं आहे पण हा डंपिंगचा धुर असल्याचं नंतर कळलं. या शहराला कसलीही शिस्त नसून सगळा बेशिस्त कारभार आहे. यावर आत्ता काही बोलणार नाही, मात्र जानेवारीत ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दिव्यात विशेष सभा घेणार असून त्यावेळी सगळं बोलेनच असा इशारा त्यांनी दिला.