पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री घोटाळ्यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.


राज्यातले बेचाळीस सहकारी साखर कारखाने हे राज्य सहकारी बॅंक आणि विविध जिल्हा मध्यवर्ती बॅंकांकडून विकण्यात आलेत. ते विकताना त्यांचं योग्य मूल्यांकन झालेलं नाही. तसेच हे कारखाने विकणारे आणि विकत घेणारे यांनी या प्रकरणी मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप शेट्टी यांनी केलाय. या बाबत मुख्यमंत्री, सरकारी अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुनही कारवाई होत नसल्यामुळे आपण आता पोलिसांकडे आलो असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.