शिर्डी : नाताळच्या लागून आलेल्या सुट्टीमुळे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलीय. त्याचा परिणाम वाहतुकीवर दिसून आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगर मनमाड महामार्गावरील अवजड वाहनांमुळे भाविकांना त्रास होऊ नये म्हणून अन्य मार्गाने वळवण्यात आली. मात्र वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. 


कोपरगावच्या पुनतांबा चौफुल्यावर पहाटे तब्बल चार तास वाहतूक कोंडी झाली होती. जड वाहनांना शिर्डीत जाण्यात मज्जाव करण्यात आला असला तरी पोलिसांच्या हातावर चिरीमिरी टेकवत ही वाहनं शिर्डीमार्गे पुढे जात असल्याचही दिसुन आलं.