ठाणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

29 व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचा ठाण्यात समारोप झाला. त्यावेळी उद्धव यांनी ही मागणी केलीय. आपलंच सरकार असताना सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी वाट का पाहायची असा सवाल उद्धव यांनी यावेळी उपस्थित केलाय. 


सावरकर आपल्या भूमीत जन्मले याचा हे आपल्या देशाचे भाग्य असल्याचे ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ख-या अर्थाने सावरकरांचे भक्त आहेत. त्यामुळे सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न मिळावं ही मागणी केंद्रापर्यत पोहचवल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणालेत..