मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळील सावित्री नदीवरील पूल 30 जूनपूर्वी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचा विश्वास राज्य सरकारनं व्यक्त केलाय. सावित्री नदीवरचा अपघातग्रस्त पुलाच्या जागी नवा पूल ३० जून पर्यंत कोणत्याही परिस्थितित पूर्ण होणार असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवरील महाड इथला सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे 3 ऑगस्ट 2016 ला वाहून गेला होता. या दुर्घटनेत 15 पेक्षा जास्त प्रवासी मृत्युमुखी पडले होते.