नागपूर : नागपुरातल्या शाळा आता फक्त सकाळच्या सत्रातच भरणार आहेत. नागपुरात तापमान प्रचंड वाढलंय. गेल्या सहा दिवसांपासून तापमान 40 अंशांच्या वर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढचे काही दिवस नागपूरमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयानं शाळा केवळ सकाळच्या सत्रात सुरु ठेवण्याचे निर्देश दिलेत. 


प्रचंड उन्हामुळे विद्यार्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे शाळा फक्त सकाळच्या सत्रातच घेण्यात येणार आहेत.