गडचिरोली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा माओवाद्यांनी दिला आहे. तशी पत्रकं त्यांनी एटापल्ली तालुक्यात टाकली आहेत.


पालकमंत्री अंबरीश आत्राम यांच्यावरही सुरजागड प्रकल्पावरुन या पत्रकांद्वारे टीका करण्यात आली आहे. स्थानिक जनतेऐवजी पालकमंत्री उद्योगपतींचं समर्थन करत असल्याचा आरोप यातून माओवाद्यांनी केला आहे.