पुणे : भिमाशंकरवरुन देवदर्शन घेऊन परतत असताना झालेल्या ट्रक अपघातात ४ ठार तर ४५ भाविक जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर जिल्ह्यातील रेणापूर गावातील हे भाविक आळंदीकडे मुक्कामी जात असताना भिमाशंकर खेड रोडवर हा अपघात झाला. या रस्त्यावरील एका वळणावर ट्रक एका दरीत पलटी झाला.


अपघातानंतर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी या अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला आणि नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. या सगळ्या जखमींवर घोडेगाव, मंचर आणि पुणे इथं उपचार सुरु आहेत.