शहापूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या शनिवारी शहापूरजवळच्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे स्वतः भेटणार आहे. महामार्गाला शिवसेनेचा विरोध नाही, पण बळीराजावर अन्याय होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. याप्रकरणी आजी माजी सनदी अधिकाऱ्यांनी महामार्गाची कुणकुण लागल्यावर आसपासच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेतल्या आहेत. 


उरलेल्या जमिनीही सरकार प्रकल्पासाठी घेणार असेल, तर नागरिकांनी खायचं काय? असा सवाल शहापूर तालुक्यातले शेतकरी विचारत आहेत. आता याप्रश्नी उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांच्या बाजूनं उभे राहिले आहेत.