नागपूर : पाच वर्षांत महाराष्ट्राला देशातलं नंबर एकचं राज्य बनवू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज राज्य सरकारला दोन वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री नागपूरमध्ये बोलत होते.


2 वर्षात सरकारनं सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली... जलयुक्त शिवार आणि सिंचन क्षेत्रातील कामांच्या मदतीने 5 हजार गावे दुष्काळ मुक्त केलीयत, 5 वर्ष संपेपर्यंत  तब्बल 20 हजार गावे दुष्काळ मुक्त करु, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. दोन वर्षं पूर्ण होत असताना आम्ही celebration वर नव्हे तर communication वर भर दिलाय, असंही ते म्हणाले.