चंद्रपूर : महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोग आपल्या दारी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.


या उपक्रमामुळे फायदा होत असल्याचंही रहाटकर यांनी सांगितलं. ११ महिन्यात आयोगाकडच्या साडेपाच हजार प्रकरणांचा आकडा आता अडीच हजारांवर आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.