संगमनेर : राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबायचं नाव घेत नाहीत. संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडग्यातील शेतकरी शांताराम हांडे यांनी शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शांताराम यांच्यावर युनियन बॅंकेचं जवळपास 1 लाख 60 हजार रुपयांचं कर्ज होतं. त्यांनी पिककर्जापोटी 60 हजार तर शेततळ्यासाठी 70 हजाराचं कर्ज घेतलं होतं. 


मात्र, निसर्गाची अवकृपा आणि आढळा धरणाचं पाणी न मिळाल्यानं शेतात काही पिकलं नाही. त्यात बॅंकेनं कर्ज फेडण्यासाठी तगादा लावल्यानं शांताराम यांनी मरणाला जवळ केलं. त्यांना एक मुलगा, एक मुलगी असून, त्यांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न त्यांच्या पत्नीला पडलाय.